खेळ मांडियेला वाळवंटी

नंदन होडावडेकर
 
नैऋत्य अमेरिकेतल्या यूटाह, कोलोरॅडो, अ‍ॅरिझोना आणि न्यू मेक्सिको ह्या राज्यांत लाखो मैलांवर पसरलेलं कोलोरॅडो नदीचं पठार हा जैववैविध्याचा एक सुरेख नमुना आहे. ग्रँड कॅन्यनसारखी महाप्रचंड घळई, सर्वदूर पसरलेल्या लाल मातीतून डोकावणारे महाकाय खडक आणि नैसर्गिकरीत्या झीज होऊन त्यातून तयार झालेल्या आकर्षक कमानी, वेगवेगळ्या खनिजांमुळे त्या खडकांवर चढलेले रंग, नजर पसरेल तिथवर पसरलेल्या शुभ्र वाळूच्या वाळवंटाचं स्थितप्रज्ञ सौंदर्य, उल्का आदळून तयार झालेलं मैलभर व्यासाचं विवर, नैसर्गिक प्रक्रियेने झाडांच्या खोडांचं टणक दगडांत झालेलं रूपांतर -- एक ना अनेक.

कोल्हापूरचा समृद्ध कलावारसा

शरद
 
कोल्हापूर कशाकरिता प्रसिद्ध आहे ? अंबाबाईच्या देवळाकरिता, चांदीच्या साजाकरिता, चपलेकरिता की लवंगी मिरचीकरता? हे सगळे आहेच, पण कोल्हापूर कलानगरीही आहे. मग कोणाला अल्लादियाखांसाहेब आठवतील तर कोणाला शालिनी सिनेटोन वा भालजी पेंढारकर. पण कलावारसा म्हटले की त्याला परंपरा पाहिजे, आणि ती आहे 'चित्रकलेची'. आपण १८८५ पासून आजपर्यंतचा विचार केला तर सव्वाशे वर्षे तरी ही परंपरा उज्ज्वल आहे; संपूर्ण हिंदुस्थानातच नव्हे तर बाहेरही नावाजलेले कलाकार या नगरातून निर्माण झाले आहेत.

वाहन- सुरक्षा आणि काळजी

चाणक्य
 
हे खरं आहे की चारचाकी ही दुचाकीपेक्षा नक्कीच सुरक्षित. पण ती सुरक्षित असे आपण का म्हणतो? उत्तर सोपे आहे. चारचाकी तयार करतानाच, ती वापरणार्‍यांच्या आरामाइतकेच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्त्व दिले गेलेले असते ते चारचाकीमध्ये बसणारर्‍या प्रवाशांच्या सुरक्षिततेला.

वैचारिक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया

प्रभाकर नानावटी
 
आपण चुकीचा विचार का करतो, हा प्रश्न मनात आल्यास आपण खरोखरच मूर्ख तर नाही ना, असे वाटू लागते. सामान्यपणे तसे काही नसते. आपण मोठमोठ्या हुद्द्यावर असतो. अत्यंत जोखमीची कामं हाताळतो. आपल्या काही निर्णयामुळे हजारो हातांना रोजगार मिळतो, आपल्यामुळे गुंतागुंतीची यंत्रणा वा व्यवस्था विनातक्रार काम करत असते. अनेकांचे जीव वाचतात. तरीसुद्धा काही प्रसंगी आपल्यातील बहुतेकांच्या - डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योगपती, नोकरदार यांच्यासकट शिकलेले सवरलेले व अशिक्षितांच्यासुद्धा - विचार करण्यात, विचार करण्याच्या पद्धतीत काही उणीवा राहिलेल्या जाणवतात. या उणीवांचे मूळ आपण जोपासत असलेल्या श्रद्धापर्यंत पोचते.

आयुधे, औजारे आणि यंत्रे

आनंद घारे
 
आदिमानवाने जेंव्हा पहिल्यांदा हातात एक दांडके धरून त्याने जोराचा दणका दिला असेल, तेंव्हा त्यातून दोन गोष्टी साध्य झाल्या. फक्त आपल्या हाताने तो जेवढ्या जोराने प्रहार करू शकला असता त्यापेक्षा जास्त परिणामकारक तडाखा त्याने दिला आणि दुसरी म्हणजे त्याचा हात जेथपर्यंत पोचू शकला असता त्याच्या पलीकडे त्याचा मारा पोचला.

क्रयशासन

प्रकाश घाटपांडे
 
एखादी यंत्रणा निर्माण करणे एकवेळ सोपे आहे पण ती यंत्रणा सुरळीत राखणे जिकीरिचे बनते. मग मनुष्यबळाची कमतरता, आर्थिक तरतूद कमी असणे, ही कारणे पुढे केली जातात. पण ती सर्वस्वी खरी नसतात. नियोजन, इच्छाशक्ती व अधिकार यापैकी कुठल्यातरी एका वा सर्व गोष्टींचा अभाव हेच बहुतांशी सत्य आहे.

जैन तत्त्वांबद्दल हा लेख आहे आणि नाही - विरोधाभासी स्याद्वाद आणि सांख्यिकी

धनंजय वैद्य
 
जैनांच्या "स्याद्वाद" शब्दाशी माझी ओळख करून दिली ती पु. ल. देशपांडेंच्या आचार्य पोफळेंनी. "तुझं आहे तुजपाशी" नाटकातला प्रसंग आहे. काकाजींच्या बेवक्तशीरपणाला आचार्य "आदिमानवाइतके मागसलेपण" म्हणतात. तर काकाजी शंका काढतात - आदिमानवापासून आतापर्यंत झाली ती प्रगती की अधोगती? आचार्य पोफळे अशा संशयाची नास्तिक आणि स्याद्वादी म्हणून निर्भर्त्सना करतात. नाटकात काकाजींचे पात्र समतोल आहे, आणि आचार्यांचे पात्र आक्रसताळे आहे. त्यामुळे अर्थातच आचार्यांकडून टीका म्हणजे स्याद्वादाची प्रशंसाच! तरी स्याद्वाद नेमका काय आहे, त्याबद्दल तेव्हा मला काही कळले नाही.

दामोदर धर्मानंद कोसंबी

चित्रा
 
आपल्याला ज्ञात असतो तो इतिहास म्हणजे मुख्यत्वे राजेरजवाडे आणि त्यांचे वंश, त्यांच्यातील लढाया आणि त्यांच्या सनावळ्या यांचा असतो. त्यातही भारतीय इतिहासाचे लेखन हे गेल्या काही शतकांपासून मुसलमानी सरदारांच्या स्वार्‍यांपासून सुरू होई, त्यानंतर हळूहळू त्याआधीदेखील इतिहास घडला होता हे काही इतिहासकारांच्या ध्यानी आल्यामुळे या इतिहासाच्या अभ्यासात गुप्त राजे, अशोकाचे आणि चंद्रगुप्ताचे साम्राज्य अशी भर पडत गेली.

टॅटू - एक कायमस्वरुपी शृंगार

प्रियाली
 
हे काय भलतंच. नसती फ्याडं सुचतात एक एक. जंकी, ड्रगी, हिप्पी, फ्याशनच्या जगतातील काही बिघडलेले कलावंत यांच्याखेरीज कोणीही टॅटू लावत नाहीत. अमेरिकेत एखादे फ्याड निर्माण झाले की लग्गेच आपण त्याचे कित्ते गिरवायलाच हवेत, नाही का? आपल्या अंगावर काहीतरी कोरून घ्यायचे, त्याचे साइड इफेक्ट्स, इन्फेक्शन झाले तर पंचाईत. एडसचा बागुलबुवा आहेच वर. आपल्या कातडीत सुया टोचून रंग खुपसून घेण्याचा रानटीपणा आणि त्यातून काही वर्षांनी आपण कसला मूर्खपणा करून बसलो असे वाटले तर पश्चात्ताप करत बसायचं. तो टॅटू पुसून टाकणे इतके सोपेही नाही.

भारतातले मूळ रहिवासी

चंद्रशेखर
 
भारतातले मूळ रहिवासी कोण? हा प्रश्न गेली दोन शतके तरी विचाराधीन आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्याचा एक प्रयत्न एकोणिसाव्या शतकात इंग्रजांचे राज्य आल्यानंतर केला गेला. भारतात विंध्य पर्वताच्या उत्तरेस रहाणारे उत्तर भारतीय व दक्षिणेस रहाणारे दक्षिण भारतीय यांच्या दिसण्यात व चालीरितीत भिन्नता दिसत असल्याने ते निरनिराळ्या वंशाचे असावेत असा अंदाज काही भारतीय व युरोपियन विचारवंतांनी केला. संस्कृतपासून निर्माण झालेल्या भाषांचे व्याकरण आणि इंग्रजी वगळता, इतर युरोपियन भाषांचे व्याकरण यात बरेच साम्य असल्याने, या भाषा जिथे प्रामुख्याने बोलल्या जातात तो एक उत्तर भारतीय गट व द्रविड मूलाच्या भाषा जिथे बोलल्या जातात तो दक्षिण भारतीय दुसरा गट असा विचारही केला गेला.

विस्थापितांना सुस्थापित करणारा एक प्रकल्प

विकास देशपांडे
 
मानवी संस्कृतीच्या उगमापासून स्थलांतर आणि पर्यायाने विस्थापन होतच राहिले आहे. वरकरणी अशा विस्थापित होण्याची काही कारणे दिसली तरी मुळाशी गेले तर त्यात मुख्यतः दिसतो तो दुर्बलपणा - कधी पैशाच्या अभावाने आलेला तर कधी राजकीय बलाच्या अभावाने, कधी लोकसंख्येत अल्पसंख्य म्हणून तर कधी धर्माने आणि/अथवा वंशाने अल्पसंख्य म्हणून.

तर्कक्रीडा

य. ना. वालावलकर

व्यंगचित्रे

महेंद्र भावसार

शटरस्पीड

वरुण वैद्य
 
कोणत्याही छायाचित्राचे तीन सगळ्यात महत्त्वाचे घटक म्हणजे ऍपर्चर साइज, शटर स्पीड आणि आय. एस. ओ. ही नावे परिचयाची नसल्याने आणि त्यांचे मोजमाप काहीशा अगम्य आकड्यांत केले जात असल्याने, हा एकूणच सगळा गोंधळात टाकणारा प्रकार वाटतो. एखादे गाणे आवडायला त्याचे तांत्रिक विश्लेषण माहीत असणे गरजेचे नसते तसेच कोणत्याही छायाचित्राचा आस्वाद घ्यायला ही माहिती असणे अजिबात आवश्यक नाही.

एक उत्क्रांती अशीही

राजेंद्र
 
आमिरचा घजनी आल्याबरोबर बर्‍याच तरूणांनी 'घजनी कट' मारला. ते पाहून नाक मुरडणारे त्यांचे काका-मामा म्हणाले, "काय ही आजकालची पोरं! काहीतरी फ्याड आहे झालं." अर्थात ते त्यांच्या काळात देव आनंदसारखा केसांचा कोंबडा ठेवत होते ते सोडा. पण खरेच ही गोष्ट फ्याड म्हणून सोडून देण्याइतकी क्षुल्लक आहे का? की यामागे काही वेगळेच कारण आहे?

कूटलिपी - एक विचार

हैयो हैयैयो!
 
भारतातील गुप्त राजांच्या कार्यकाळात प्रचलित असलेल्या 'गुप्त - कुटिल - कूट' नामक लिपींवर ही चर्चा नव्हे. मध्यंतरी उपक्रमावर झालेल्या नाडिग्रंथ चिकित्साविषयक चर्चेमुळे ह्या नाडिग्रंथातील लिपीबाबत माझी स्वत:ची जिज्ञासा जागृत होवून लिपीशास्त्राभ्यासासाठी एक जिज्ञासा म्हणून त्यातील लिपीबद्दल जो शोध घेतला त्याबद्दल एक विचार मांडणे हे ह्या लेखनाचा उद्देश आहे.

PLM - नव्या संकल्पनेची ओळख

प्रसाद जोशी
 
आजच्या गतिमान बाजारपेठेत स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी विविध कंपन्यांची चढाओढ चालू असते. आम्ही बनविलेले उत्पादन बाजारात लवकरात लवकर कसे आणता येईल, त्यातून आम्ही अधिकाधिक नफा कसा कमवू शकू, कमीत कमी किंमतीत ग्राहकाला जास्तीत जास्त समाधान कसे मिळू शकेल? या आणि अशा अनेक उद्दिष्टांसाठी प्रत्येक कंपनी धडपडत असते. या आणि अशा सर्व प्रश्नांची मोट बांधण्याचे काम करणारा दुवा बाजारात स्थिर होऊ पाहतोय - तो आहे - PLM.