नंदन होडावडेकर
नैऋत्य अमेरिकेतल्या यूटाह, कोलोरॅडो, अॅरिझोना आणि न्यू मेक्सिको ह्या राज्यांत लाखो मैलांवर पसरलेलं कोलोरॅडो नदीचं पठार हा जैववैविध्याचा एक सुरेख नमुना आहे. ग्रँड कॅन्यनसारखी महाप्रचंड घळई, सर्वदूर पसरलेल्या लाल मातीतून डोकावणारे महाकाय खडक आणि नैसर्गिकरीत्या झीज होऊन त्यातून तयार झालेल्या आकर्षक कमानी, वेगवेगळ्या खनिजांमुळे त्या खडकांवर चढलेले रंग, नजर पसरेल तिथवर पसरलेल्या शुभ्र वाळूच्या वाळवंटाचं स्थितप्रज्ञ सौंदर्य, उल्का आदळून तयार झालेलं मैलभर व्यासाचं विवर, नैसर्गिक प्रक्रियेने झाडांच्या खोडांचं टणक दगडांत झालेलं रूपांतर -- एक ना अनेक.
शरद
कोल्हापूर कशाकरिता प्रसिद्ध आहे ? अंबाबाईच्या देवळाकरिता, चांदीच्या साजाकरिता, चपलेकरिता की लवंगी मिरचीकरता? हे सगळे आहेच, पण कोल्हापूर कलानगरीही आहे. मग कोणाला अल्लादियाखांसाहेब आठवतील तर कोणाला शालिनी सिनेटोन वा भालजी पेंढारकर. पण कलावारसा म्हटले की त्याला परंपरा पाहिजे, आणि ती आहे 'चित्रकलेची'. आपण १८८५ पासून आजपर्यंतचा विचार केला तर सव्वाशे वर्षे तरी ही परंपरा उज्ज्वल आहे; संपूर्ण हिंदुस्थानातच नव्हे तर बाहेरही नावाजलेले कलाकार या नगरातून निर्माण झाले आहेत.
चाणक्य
हे खरं आहे की चारचाकी ही दुचाकीपेक्षा नक्कीच सुरक्षित. पण ती सुरक्षित असे आपण का म्हणतो? उत्तर सोपे आहे. चारचाकी तयार करतानाच, ती वापरणार्यांच्या आरामाइतकेच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्त्व दिले गेलेले असते ते चारचाकीमध्ये बसणारर्या प्रवाशांच्या सुरक्षिततेला.
वैचारिक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया
प्रभाकर नानावटी
आपण चुकीचा विचार का करतो, हा प्रश्न मनात आल्यास आपण खरोखरच मूर्ख तर नाही ना, असे वाटू लागते. सामान्यपणे तसे काही नसते. आपण मोठमोठ्या हुद्द्यावर असतो. अत्यंत जोखमीची कामं हाताळतो. आपल्या काही निर्णयामुळे हजारो हातांना रोजगार मिळतो, आपल्यामुळे गुंतागुंतीची यंत्रणा वा व्यवस्था विनातक्रार काम करत असते. अनेकांचे जीव वाचतात. तरीसुद्धा काही प्रसंगी आपल्यातील बहुतेकांच्या - डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योगपती, नोकरदार यांच्यासकट शिकलेले सवरलेले व अशिक्षितांच्यासुद्धा - विचार करण्यात, विचार करण्याच्या पद्धतीत काही उणीवा राहिलेल्या जाणवतात. या उणीवांचे मूळ आपण जोपासत असलेल्या श्रद्धापर्यंत पोचते.
आनंद घारे
आदिमानवाने जेंव्हा पहिल्यांदा हातात एक दांडके धरून त्याने जोराचा दणका दिला असेल, तेंव्हा त्यातून दोन गोष्टी साध्य झाल्या. फक्त आपल्या हाताने तो जेवढ्या जोराने प्रहार करू शकला असता त्यापेक्षा जास्त परिणामकारक तडाखा त्याने दिला आणि दुसरी म्हणजे त्याचा हात जेथपर्यंत पोचू शकला असता त्याच्या पलीकडे त्याचा मारा पोचला.
प्रकाश घाटपांडे
एखादी यंत्रणा निर्माण करणे एकवेळ सोपे आहे पण ती यंत्रणा सुरळीत राखणे जिकीरिचे बनते. मग मनुष्यबळाची कमतरता, आर्थिक तरतूद कमी असणे, ही कारणे पुढे केली जातात. पण ती सर्वस्वी खरी नसतात. नियोजन, इच्छाशक्ती व अधिकार यापैकी कुठल्यातरी एका वा सर्व गोष्टींचा अभाव हेच बहुतांशी सत्य आहे.
