तर्कक्रीडा: सांघिक परीक्षा

य. ना. वालावलकर

एका संस्थेत सोळा प्रशिक्षणार्थी घ्यायचे होते.प्राथमिक चाचणी घेऊन सोळा जण निवडले.त्यांना अंतिम कसोटीसासाठी बोलावले.सर्वांना एका वर्गात बसवून पुढील प्रमाणे निवेदन केले :--

  • या कसोटीत सोळा जणांचा संघ भाग घेईल.तुमची नावे आणि क्रमांक या फलकावर आहेत.
  • तुम्ही फलकाकडे तोंड करून एका मागे एक असे उभे राहायचे.प्रथम क्र.१. त्याच्या मागे काही अंतरावर क्र. २.त्याच्या मागे क्र.३...या प्रमाणे शेवटी क्र.१६.
  • तुमच्या हाती एक साधन असेल. त्यावर दोन बटणे असतील.काळे आणि पांढरे.
  • अवयव कोणते?

    १७५७०५१ या संख्येचे १ व ती संख्या सोडून किती अवयव आहेत आणि ते कोणते?

    प्रेषक: वैभव कुलकर्णी

  • प्रत्येकाच्या डोळ्याला पट्टी बांधली जाईल.
  • प्रत्येकाच्या डोक्यावर एक टोपी घातली जाईल. ती काळी असेल अथवा पांढरी.
  • आता सर्वांच्या डोळ्यांवरील पट्ट्या काढल्या जातील.क्र.१६ ला त्याच्या पुढील पंधरा टोप्या दिसतील. या प्रमाणे क्र. १० ला नऊ दिसतील .तर क्र. १ ला एकही टोपी दिसणार नाही.
  • परीक्षक सर्वप्रथम क्र. १६ ला प्रश्न विचारतील ,"तुझ्या डोक्यावर काळी टोपी आहे की पांढरी?"उत्तरासाठी त्याने साधनावरील बटण दाबायचे.काळे दाबल्यास फलकावर त्याच्या नावापुढे "काळी" असे उत्तर उमटेल.
  • हाच प्रश्न क्र.१५ला,१४ ला..असा विचारला जाईल. शेवटी क्र. १ला हाच प्रश्न असेल.
  • फळ्यावरील सर्व उत्तरे सर्वांना दिसतील.
  • सोळांतील किमान पंधरा उत्तरे अचूक ठरल्यास सोळा जणांच्या संघाची निवड होईल. अन्यथा एकाचीही नाही.सांघिक कामाचे महत्त्व तुम्ही जाणताच.
  • अजून पंचवीस मिनिटांनी प्रत्यक्ष कसोटी सुरू होईल.तोवर चर्चा करून तुम्ही रणनीती ठरवा.बाहेर कुणाशीही संपर्क साधायचा नाही.कसोटीच्या वेळी काहीही बोलणे खाणाखुणा करणे, दुसर्‍याला स्पर्श करणे निषिद्ध आहे.

तर निदान पंधरा उत्तरे अचूक येण्यासाठी त्यांनी कोणती रणनीती (स्ट्रॅटेजी) ठरवावी?